Saturday, September 28

स्री इतिहास बदलला, नाही,घडला.

इतिहास लिहायला गेले की, एका पानात ही होतो आणि लिहायला गेले की पाने व वेळ ही कमी पडतात. इतिहास घडवता येतो,इतिहास बदलता येतो हे ही खरे आणि इतिहास बदलता येत नाही हे ही खरे.
       याचेच उदाहरण स्री-शिक्षण, स्री-शिक्षणाचा इतिहास कसा घडला हे पाहू, 18 व्या-19 व्या शतकात चाललेल्या पुराणमतवादी,मनुस्मृतिवादी,सनातनवादी यांनी त्यांच्या पौराणीकतेचा परंपरागत चालत असलेल्या रूढिचे दाखले देऊन स्री-शिक्षणाला विरोध केला. फक्त स्री-शिक्षणच नव्हे तर बालविवाह, जातिभेद, विधवा पुनर्विवाह विरोध,स्री शोषण,घरातील उंबरठयातील स्री अश्या प्रकारच्या विचारांना पाठपुरावा केला,परन्तु इतिहास घडवला तो सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई,डॉ.आनंदिबाई जोशी,अन्नपूर्णाबाई भंडारकर आदि. स्रीयांनी घडवला.त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे सारथी महात्मा जोतिबा फुले,न्यायमूर्ति महादेव रानडे,लोकहितवादी,सार्वजनिक काका,भांडारकर आदि.समाजसुधारक. हे महान व्यक्ति पुन्हा होने नाही, हा इतिहास आपण बदलू शकत नाही याचे उदाहरण.
       आता  इतिहास कसा बदलला हे पाहू,म्हणजेच इतिहासाच्या वेग वेगळ्या टप्यावर इतिहास कसा बदलत गेला.प्राचीन इतिहासात वेग वेगळ्या टप्यावर मातृप्रधान संस्कृति होती.वैदिक काळात पितृसत्ताक संस्कृति होती परन्तु स्रियाना समानता मिळे,बालविवाह, सतीप्रथा, याला बंदी होती व राजकीय,शिक्षणाचा हक्क होता.
उत्तर वैदिक काळात वर्ण आले आणि स्रियानचे महत्व कमी कमी होत गेले.जस जशी इतिहासाची पाने पालटली जात होती तस तशी स्रियांनचे महत्व कमी होत गेले,त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर नेत गेले.मद्ययुगीन इतिहासाचा कालखंड असाच खाली वर होत गेला. 18 व्या शतकात स्रियांन विषयिचे महत्व,त्यांचे शिक्षण,हक्क यांची ज्योत हळू हळू जळत होती. असे म्हणतात, "शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे,ते एकदा घेतले तर गुर्रगुर्रल्या शिवाय राहत नाही" आणि आतापर्यंतच्या इतिहासात असे बदल झाले की आजची स्री ही कोणत्या शिखरावर पोहचलि हे वेगळे सांगने नाही ,असा बदलला इतिहास.
      आज आपण 21व्या शतकात आहोत आजची स्री शिकुन तिला तिच्या हक्कानची जाणीव झाली आहे आणि भारता सारख्या लोकशाही देशात स्रियानविषयी काही योजना,कायदे केलेले आहेत,परन्तु रोजच्या बातम्या वाचल्या की ,दहापैकी एक बातमी तिच्या कर्तुत्वाचे गुण गाणारे आणि 9 बातम्या तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी. 18-19 व्या शतकात जो समाजसुधारकानी जो स्री शिक्षणाचा खटाटोप,संघर्ष केला तो अजूनही काही प्रमाणात काही लोकांपर्यंत पोहचला नाही.
इतिहासाची अजुन पाने चाचपळली कि आपल्याला त्यांनी केलेल्या कार्याची,त्यांचा कर्तुत्वाची जाणीव होते, या त्यांच्या कार्याला सलाम.

🙂THR🙂

2 comments:

  1. छान माहिती आहे....!
    इतिहास बदलणे अशक्य तसे जतन करणे नि कधी बदलणेही शक्य अशा दोन्ही भूमिका ठामपणे मांडल्या आहेत.

    ReplyDelete