Wednesday, December 30

मन...1

 मन म्हणजे एक विचारच की,

मन कधी मनाने घडून गेलेल्या घटनांचे पुनार्वलोकन करते आणि भूतकाळात घेऊन जाते,

मन कधी मनाने घडत असलेल्या घटनांचे पुनार्वलोकन करते आणि वर्तमानकाळात आणते,

मन कधी मनाने घडणाऱ्या घटनांचे पुनार्वलोकनाचे आभास करते आणि भविष्यात घेऊन जाते,

मन हे असेच असते...

मन कधी कल्पना करते आणि दुखःत घेऊन जाते, 

कधी कधी मन कल्पना करून समस्याचे निराकरण करते आणि आनंदात घेऊन जाते

मन हे असेच असते हो...

THR

To be continue...

Sunday, December 27

मुलीची जात...

 लिहायला गेल तर खुप लिहता येत

खुपश्या गंभीर प्रश्नांवर लिहता येत

पन काय करणार, 

"तू मुलीची जात" अस लेखनी सांगून जाते...

आणि लेखनी पुनः कम्पास पेटित बंद होते


बोलायला गेल तर खुप बोलता येत

खुपश्या गंभीर प्रश्नांवर बोलता येत

पन काय करणार, 

"तू मुलीची जात" अस चावी/किल्ली सांगून जाते...

आणि तोंडाचे कुलुप पुनः बंद होते.

Tuesday, December 22

फालतू मेसेज

 हा लेख मी एका ग्रूप वर वाचला, आपले मत या लेखाविषयी काय आहे नक्की कमेंट मध्ये लिहा... धन्यवाद🙏🙂

{*समाजाच्या मुलाशीच लग्न करणाऱ्या समाज कन्येचा लग्नात जाहीर सन्मान - सत्कार*नमस्कार, 

      आज समाजातील विवाह इच्छुक मुलांसाठी मुलींचे प्रमाण खूप कमी प्रमाणात आहे, मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळे अल्पशिक्षित, व्यवसाय करणारे, कमी पगार असणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे, 

        तसेच अत्यंत गंभीर बाब म्हणजे आपल्या समाजाच्या मुलींचे इतर समाजात आंतरजातीय विवाहाचे प्रमाण अधिकाअधिक वाढत आहे, काही पालक आपल्या मुलींचे लग्न स्वतः हुन इतर समाजात लावून देत आहेत, त्यामुळे *आपल्या समाजातील मुलांना मुली मिळणे खूप कठीण नाही तर खूप अवघड झालेले आहे,* भविष्याचा विचार केला तर आपल्या समाजातील मुलांच काय?? ?? ?? 

      आतापर्यंत समाजातील कुठल्याही संस्था समितीने यावर प्रकाश टाकून, विचारविनिमय केलेला दिसून आलेला नाही.

      *समाजाच्या मुलांना न्याय मिळावा म्हणून, ज्या समाजाच्या मुली समाजाच्या मुलासोबत सोबत लग्न करतील अशा मुलींना विवाह प्रसंगी *आदर्श समाज कन्या विवाह* म्हणून सन्मानित करण्याचा निर्णय आम्ही आमच्या मार्फत घेत आहोत, जेणेकरून आपल्या समाजातील मुलींचे बाहेर समाजात लग्नाचे प्रमाण कमी होईल. 

*एक पाऊल*,

*समाज जनहितार्थ* }


हा मेसेज वाचल्यावर आपण, खरचं २१व्या शतकात आलोय?, 

खरचं असा विचार करून आपण एक पाऊल पुढे जातोय की १०० पावल मागे?,

खरचं? मला कुणी विचारल्यावर की मी कोण? तर मी ह्या समाजाचा अस उत्तर द्यावं की मी भारताचा हे उत्तर द्यावं?, 

खरचं? मी या मोठ्या पदावर आलोय तर मी फक्त माझ्या समाजाचा विचार करावा की माझ्या देशाचा विचार करावा?, 

खरचं मी आज जे माझं यश मिळवलंय किंवा मिळणार आहे त्यात फक्त माझा समाजाचा वाटा आहे की माझ्या देशाचा?,

खरचं संविधानातील कलमे समानतेचा हक्क मला माझ्या समाजाचा विचार करायला लावतो की माझ्या देशाचा?,

खरचं स्री पुरुष समानता आहे का की अजूनही मुलींना दुय्यम दर्जाचे समजले जाते?,

खरचं ???

असे कित्येक प्रश्न आपल्याला पडतात, यावर फक्त एकच उत्तर... आम्ही सर्व भारतीय आहोत 🇮🇳🙏🙂 मला भारतीय असण्याचा अभिमान आहे .


उद्देशिका

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच

त्याच्या समस्त नागरिकांना:

सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,

विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा

व उपासना यांचे स्वतंत्र ;

दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे

प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करुन;

आपल्या या संविधान सभेत आज दिनांक

नोव्हेंबर २६, १९४९ ला एतद्द्वारे या संविधान ला अंगीकृत,

अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.[१][२][३]