Friday, September 5

संवाद✨

 नात्यांमध्ये गैरसमज होणे अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळे, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे प्रश्न निर्माण होतात. पण खरी गोष्ट अशी आहे की गैरसमज टाळता येत नाहीत, मात्र ते मिटवता नक्की येतात. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. आपण मनातल्या गोष्टी मनातच ठेवून दिल्या तर त्या राग, दुःख किंवा नाराजीमध्ये बदलतात. पण एकदा मन मोकळं करून समोरच्याशी बोलायला सुरुवात केली, तर गैरसमज दूर होण्याची शक्यता वाढते. संवाद हा नात्याचा श्वास आहे. जसं श्वासाशिवाय जीवन नाही, तसंच संवादाशिवाय नातं टिकत नाही. म्हणूनच, नातं टिकवायचं असेल तर मौन न बाळगता, प्रेमाने आणि संयमाने बोलणे हा एकमेव मार्ग आहे.

THR ✨ 

No comments:

Post a Comment