Sunday, December 8

बाजार

शिक्षणाचा बाजार ही नवीन संकल्पना आजच्या युगात अगदी वाढत चालली आहे. मग या बाजारात कोणत्या प्रकारच्या भाज्या असतील कोणत्या नवीन प्रकारच्या भाज्या येथील माहित नाही.
शिक्षण म्हणजे? याचा आजच्या काळातील पूर्ण अर्थ असा की, शि-शिकवण्या, क्ष-क्षणप्रभा, न-नदी (Teachings classes is the powerful/lighting of river) असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज मुलीला किंवा मुलाला शाळेत टाकायचे,मग ते पहिलीत नाही तर, केजी वन, केजी टू, केजी थ्री, पहिली ते दहावी, अकरावी-बारावी, डिग्री, इतर. या केजी ते डिग्री आणि अजून पुढच्या प्रवासात टिचिंग इंस्टिट्यूशन्स किंवा क्लासेस खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. खरंच?
केजी ला शाळेत ऍडमिशन घेतले की क्लासेस पण लावावे हे कंपल्सरी, क्लास त्या विद्यार्थ्यांचा आयुष्यभर पिच्छा सोडत नाहीत. आजच्या काळात पूर्ण शिक्षण होईपर्यंत क्लासेस लावणे गरजच बनली आहे. आपला पाल्य शाळेत गेला म्हणजे, त्याला किंवा तिला वाचता लिहिता आले पाहिजे त्यात नवोदयच्या परीक्षेला बसल्यावर त्यासाठी वेगळी ट्युशन, कारण "नवोदय ची परीक्षा पास व्हायला पाहिजे, आमच्या मुली किंवा मुलाच्या क्लासवाल्यानी तशी हमी 101% दिली आहे".
ट्युशन ही तशी केजी ते नववीपर्यंत चालू असते, आता दहावी किंवा मॅट्रिक किंवा एसएससी अजून किती नाव आहेत माहित नाही, अरे हो एक नाव राहिले की 'टर्निंग पॉईंट', आता दहावीला आपला मुलगा किंवा मुलगी आहे, चांगली क्लासेस लावायचे, ते म्हणतात ना हाय-फाय वगैरे, तसे मग एकच क्लास नाही दोन ट्युशन लावायच्या कारण "आमचा मुलगा किंवा मुलगी दहावीला आहे आणि असे ऐकले आहे की खूप अवघड असते ती परीक्षा". खरंच?
जशी दहावीची वरील प्रमाणे परिस्थिती तशीच बारावीची पण असते बरं का!(टर्निंग पॉईंट),अजून डिग्री त्यानंतरचे शिक्षण किंवा करिअर आहेच, त्याचे क्लासेस लावावे लागतात, म्हणजे केजीपासून तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळा+ट्युशन कंपल्सरी.
आता प्रश्न पडला ट्युशन का? किंवा शिकवण्या का? जास्त नाही फक्त तीन-चार जणांना विचारले तर म्हणाले,
"अहो शाळेत शिकवत नाहीत व्यवस्थित",
"ट्युशनचे शिक्षक खूप छान शिकवतात",
"नोट्स पण सोपे आणि छान असतात क्लासेसचे"...वगैरे वगैरे.
आता शिक्षकांची भूमिका,
"तुम्ही शाळेत शिकवत का नाही?"
"अहो, वर्गात असा कोणताही विद्यार्थी नाही, कि त्याने ट्युशन लावली नाही, त्यांना ट्युशन मध्ये शिकवतात म्हणून वर्गात शिकण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही आणि शिकवायला लागलो तर मुले पुढे पुढे बोलतात, म्हणतात आमच्या क्लासेसमध्ये झाले आहे".
"पण तुम्ही शिक्षक का बनला,त्यांना अभ्यास समजून सांगावा हे तुमचे काम?"
"समजून सांगतो की"
" कुठे?"
"माझी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे, मी तेथे माझ्या विद्यार्थ्यांना समजून सांगतो, मी खूप मेहनत घेतो, मागच्या वर्षी तर जे पाच विद्यार्थी टॉप केले ते माझ्या क्लासमधली"
"का? तुमच्या शाळेतील नाही का, जेथे तुम्ही शिकवतात?"
"अहो खरं सांगितलं तर मीही रीझाइन करणार आहे, क्लासेसमध्ये प्रॉफिट खूप आहे, काही नाही करायचं फक्त एक वर्ष जीव तोडून शिकवायचे आणि मग काय आपला क्लास फेमस झाला की मग टेन्शन नाही, तेच विद्यार्थ्यांचे फोटो पोस्टरवर,फक्त वर्षे बदलायचे आणि एक-दोन आधीपासून हुशार असतात त्यांना आपल्या क्लासचे म्हणून चिठ्ठ्या पूरवायच्या म्हणजे कॉफी करायची, वाढली की नाही आमच्या क्लासची पोस्टर ची लोकसंख्या"
 ही आहे आजची सत्य परिस्थिती, शाळेतील केजी ते शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे, शाळेत शिक्षकाकडून सांगितले जाते,"माझ्या क्लास मध्ये ऍडमिशन घ्या".
आज शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांना जीव तोडून शिकवण्याची पद्धत होती ती नाही राहिली, काही विद्यार्थी क्लास लावतात काही नाही, पण ज्यांनी क्लास नाही लावला त्यांचे नुकसान, मग आर्थिक परिस्थिती नसतानाही क्लास लावावाच लागतो.
 खरं पाहिलं तर क्लासमध्ये शिकवणारे कोण असतात तर कॉलेजमध्ये शिकणारे वीद्यार्थी, पण यात क्लासमुळे एक चांगले आहे, बेरोजगारी कमी होत आहे.
 पण खरा शिक्षक व खरा शिक्षकी पेशा ही कमी होत चाललाय, तुमचे शिक्षण पूर्ण झाले परंतु खरे ज्ञान कुठून येणार. खरे जिवतोडून शिकवणारे शिक्षकांचा यामुळे कॉन्फिडन्स कमी होत आहे आणि शिक्षणाचा बाजार होत चालला आहे.


( वरील लेख हा ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे त्यांच्यासाठी आणि खरया शिक्षकाला त्याच्या शिक्षकी पेशाला सलाम...
जर कुणाला वाईट वाटले तर माफ करा☺️🙏)


☺️THR☺️

No comments:

Post a Comment