Wednesday, December 18

समाजसुधारणेचे फॅट

आपल्याला जर पूर्वा पासून चालत आलेल्या बिनकामाच्या विकासाच्या आड येणाऱ्या रूढी सुधरवायचा असतील तर, असे म्हणतात की सुरुवात आपल्यापासून करावी, परंतु समाजातील काही कर्मठ परंपरा ती परंपरा असे म्हणणारे त्यात बदल घडून देत नाहीत. त्यांचे म्हणणे असते रुढी-परंपरा ते आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या पाळायलाच पाहिजेत.
समाजसुधारणा करायची तर सुरुवातीला कष्ट सहन करावेच लागतात, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच पहा ना, त्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा त्यांच्यावर चिखलफेक केला गेला, पण त्यांना माहीत होतं आज आम्हाला म्हणजेच सर्व समाजसुधारकांना हा त्रास सहन करावा लागत आहे, परंतु भविष्यातील आजच्या भारताचे चित्र बदलायचे असेल तर त्रास सहन करावाच लागेल.
 आजही आपण समाजात पाहतो, एखादी व्यक्ती रूढी विरुद्ध वागली की लगेच ती बातमी  सर्वदूर पसरते व तिच्यावर टीका केली जाते, तिला वारंवार सांगितले जाते आपल्या रूढी परंपरा त्या रूढी परंपराच. अशाप्रकारे टोकाचे बोलणे ऐकून रूढी विरुद्ध गेलेली व्यक्ती पुन्हा कर्मठ रूढी मजबुरीने पाळते.
समजा एखाद्या ठिकाणी पूजा चालू असेल तर तेथे आवर्जून सांगितले जाते ही पूजा पुरुषांनीच करायची, ही पूजा महिलांची नाही, हे काम पुरुषांचे महिलांचे नाही आणि या स्त्री-पुरुष असमानतेत जास्त आवाज असतो तो महिलांचा. अहो, जग काय भारतच बघा की कुठे जात आहे, भारत चंद्रावर पोहोचलाय परंतु...?
या समाजात बोटावर मोजण्याइतके हुशार, काहीचे शिक्षण झाले असते, काहिंचे थोडेफार, तर काहींचे काहीच नाही परंतु या हुशार  लोकांना जी समाजात सुधारणा आणण्याची जी समज आली त्यांना सलाम..
To be continue...
☺️THR🙏

No comments:

Post a Comment