लॉकडाऊन वाढवावे की नाही हा प्रश्न सरकार आणि शासकीय अधिकारी ठरवतील.
मला असे वाटते की लोकांमध्ये अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे जसे की लोकांना
पटउन द्यावे की ह्या व्हायरस पासून आपण सुरक्षित राहू शकतो, फक्त काळजी घ्यावी लागेल याची माहिती टीव्ही,रेडिओ,मोबाईल व तसेच रिक्षामध्ये माईक ने सांगितले जाते, परंतु ही माहिती खरोखरच लोकांन पर्यंत पोहचत आहे का? तर नाही कारण तुम्ही रिक्षा मध्ये माईक ने सांगता तो आवाज एवढा असतो की काहीच समजत नाही,मोबाईल किंवा टीव्ही मध्ये माहिती प्रसारण करताना ती माहिती खरी खोटी तपासली जात नाही आणि फॉरवर्ड केली जाते, तसेच टीव्ही वर किती लोकांना कोरोना झाला हे ठासून सांगतात पण किती बरे झालेत ही माहिती कुठे तरी कोपऱ्यात असते यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
या व्हायरस वर मुख्य औषध काय तर त्यांची हिम्मत(हे मी बरे झालेल्या लोकांचे व्हिडिओ पाहिलेत यावरून सांगते) आणि सकारात्मक विचार.
सरकार आणि प्रशासन त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहे पण मी एक नागरिक म्हणून माझे ही कर्त्यव आहे की मी स्वतःची, माझ्या परिवाराची, माझ्या देशाची काळजी घ्यावी आता ही काळजी घ्यावी कशी? तर अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि घरातून निघाल्यावर खिशात पैसे नसतील तर चालेल पण सनिटायीझर आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा कारण कसय वेळ गेल्यावर रडण्यापेक्षा आताच सुरक्षित राहिलेले बरे.
या व्हायरस चे गांभीर्य लक्षात घ्या सोशल डीस्टन्सिन पाळा आता सोशल डीस्टन्सिन म्हणजे कोरना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात न येता त्यांना फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढवा, त्यांना हिम्मत द्या, त्यांच्या संपर्कात न येने म्हणजे त्यांना वाळीत टाकले नाही होत.
आपण आपली, आपल्या परिवाराचे, देशाचे रक्षण करत आहोत कारण हा व्हायरस आहे म्हणजे संपर्कात आल्याने होतोय. काळजी घ्या आपली आणि परिवाराची.
No comments:
Post a Comment