सुख दुःख नाही चुकले देवा दिकाला चुकणार नाही कधी या माणवाला ||धृ||
सत्यशील होता तो राजा श्रियाळ
अथितीच्या भोजनासाठी कापियले बाळ,
चांगुणा कांडतसे शिर उखळाला
चुकणार नाही कधी या माणवाला ||१||
सत्यशील नाही कोणी हरी चंद्रावाणी
राज्य वैभव सोडून वाहे डोम्याघरी पाणी,
हात जोडतसे तो स्मशान भूमीला
चुकणार नाही कधी या माणवाला ||२||
सत्यशील होता तो राजा गोपीचंद
मातेच्या वचनाचा नाही केला भंग,
सोडूनी गेला तो राज्य वैभवाला
चुकणार नाही कधी या माणवाला ||३||
श्रीकृष्णाचा जन्म झाला बंदिशाळेला
चौदा वर्षे रामप्रभू गेले वनाला,
अज्ञात वासात पांडव राहिले विराट देशाला
चुकणार नाही या माणवाला ||४||
गहिणीनाथाने बोध केला
निवृत्ती नाथाला,
निवृत्तीने बोध केला ज्ञानेश्वराला
चुकणार नाही कधी या माणवाला ||५||
सत्यशील होती ती सीता सावित्री
सर्प दंशाने मरीला पती,
यमापासून परत आणीले पतीच्या प्राणाला
चुकणार नाही कधी या माणवाला ||६||
सुख दुःख नाही चुकले देवा दिकाला चुकणार नाही कधी या माणवाला ||
गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर
पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव
हल्ली मुक्काम औरंगाबाद
🙏🏻🙂THR 🙂🙏
Very nice poem🙏🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteछान आजीची वही... तुमच्या आजीच्या वहीतील अजुन खजिना वाचायला आवडेल
ReplyDeleteKupach Chan
ReplyDeleteNice 👌
ReplyDelete